पातूर (प्रदीप काळपांडे) २६/११/२०२३ रोजी फिर्यादी नामे राजु चेलाजी प्रजापती वय २६ वर्ष रा. आंगडीया सव्र्हींस घर क्र.१०१ गजानन टॉवर शंकर नगर रोड राजापेठ अमरावती हे त्यांचे व्यापाराचे पैसे घेवून ट्रॅव्हल्स ने अमरावती येथून मुंबई येथे सेजात असता पोलीस स्टेशन पातुर हद्दीतील क्वालीटी धाब्यावर बस थांबल्यानंतर फिर्यादी हे गाडीचे बाहेर आले असता तेवढ्यातच आरोपीतांनी सदर ट्रॅव्हल्स मध्ये प्रवेश करून फिर्यादीची पैश्यांने भरलेले बॅग चोरून फरार झाले होते. वरून पोलीस स्टेशन पातुर येथे अपराध नं ५३२ / २३ कलम ३७९ भा.दं.वि नोंद असून तपासावर आहे.

सदर चोरीची उकल करण्यासाठी मा. पोलीस अधीक्षक सो, अकोला यांनी स्थागुशा अकोला यांना आदेशीत केले होते. मा.पोलीस निरीक्षक श्री. शंकर शेळके, स्थागुशा यांनी त्यांचे अधिनस्त एक पथक तयार करून सदर गुन्हा तपास करीता रवाना करण्यात आले.

पो.नि श्री. शंकर शेळके स्थागुशा. अकोला यांच्या आदेशावरून तसेच मार्गदर्शनाखाली सपोनि श्री कैलास
भगत, पोउपनि गोपाल जाधव व पो. अमंलदार यांनी सदर गुन्हयाचा छडा लावण्यासाठी गोपनिय बातमीदार तसेच तांत्रिक बाबीच्या आधारे सदर गुन्हा करण्याच्या आरोपी निष्पन्न केले. स्थागुशा अकोला येथील पथक हे मध्यप्रदेश येथे रवाना होवून
त्यांनी ग्राम खेरवा ता मनवार जि. धार येथील आरोपी नामे विनोद विश्राम चव्हाण वय १९ वर्ष रा. लुन्हेरा बुजूर्ग ता. मनावर जि. धार याचा शोध घेवून त्यास ताब्यात घेवून गुन्हया सबंधाने विचापूस केली असता, त्याचे राहते घरातुन रोखरक्कम ७९,००,०००/-रु
(ऐकोणअंशी लाख रूपये) दोन पंचा समक्ष जप्त करण्यात आले. त्यावरून त्यास त्याचे साथीदार नामे रहेमान उर्फे पवली गफुर खान
याला पोलीसांची चाहुल लागल्याने तो फरार झाला. त्याचा शोध घेतला असता तो मिळूण आला नाही.सदरची कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक अकोला श्री. संदीप घुगे साहेब, अपर पोलीस अधीक्षक श्री. अभय डोंगरे साहेब पो. नि. श्री. शंकर शेळके स्थागुशा अकोला यांचे मार्गदर्शनाखाली स्थानीक गुन्हे शाखा अकोला चे सपोनि श्री कैलास डी.
भगत, पोउपनि. गोपाल जाधव, पो. अंमलदार, गणेश पांडे, राजपालसिंग ठाकुर, रविंद्र खंडारे, महेंद्र मलिये, अब्दुल माजीद, विशाल मोरे, एजाज अहेमद, वसीमोद्दीन शेख, अविनाश पाचपोर, भिमराव दिपके, स्वप्नील चौधरी, राहुल गायकवाड, अन्सार शेख, मोहम्मंद आमीर, लिलाधर खंडारे, खुशाल नेमाडे, चालक अक्षय बोबडे, प्रविण कश्यप, प्रशांत कमलाकर, अनिल राठोड यांनी
केली आहे.